Saturday, January 29, 2022

Difference Between Anabolism And Catabolism

Differences between Catabolism and Anabolism 

 Mr.Sarjerao Yedekar (M.Sc BEd Zoology MH-SET,CTET,P.Hd Apperd)

Comparison between 
Catabolism & Anabolism

Image result for catabolism and anabolism

Anabolism
Catabolism
1.    It is a constructive process of metabolism
It is a destructive process of metabolism
2.    In anabolism, complex molecules (e.g. proteins) are synthesized from simple molecules (Amino acids)
In catabolism, complex molecules (e.g. Glycogen) are broken down into simple molecules (glucose)
3.    It is an energy (ATP) requiring process
It is an energy (ATP) releasing process
4.    It is a “Up-hill” process
It is a “Down-hill” process
5.    E.g. Protein synthesis, Glycogen synthesis, Photosynthesis
E.g. Glycogenolysis, Glycolysis, Digestion, cellular respiration

Wednesday, December 15, 2021

१२ वी सायन्स नंतर पुढील करियर विषयी माहिती व मार्गदर्शन प्रा सर्जेराव येडेकर एम एस्सी बीएड सेट सिटीईटी

 

Career path finder- After 12th. Science

  12 बारावी विज्ञान शाखा

विद्यार्थी मित्रहो ,

आज आपण 12 बारावी (विज्ञान) शाखेतील पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी व काही व्यवसायिक संधी याबद्दल माहिती पाहणार आहोत. तरी संपूर्ण माहिती आपण जाणून घ्यावी आणि आपल्या भविष्यासाठी आपल्या करिअरसाठी योग्य ती दिशा ठरवून आपणास आवडणाऱ्या योग्य त्या शैक्षणिक प्रवाहात सामील व्हावे व पुढील आयुष्य आपण आपले घडवावे. ज्या प्रमाणे म्हणतात  ' तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार' त्यामुळे आपणास स्वतःचा योग्य मार्ग स्वतः निवडायचा आहे .म्हणून मी तुम्हाला विविध कोर्सेस बद्दल माहिती सांगणार आहे. खालील प्रमाणे विविध कोर्सेस आपल्या भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

12 बारावी (विज्ञान) शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक संधी. ज्या विद्यार्थ्यांनी 12 बारावी (विज्ञान ) शाखेत फिजिक्स ,केमिस्ट्री ,बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स (जनरल सायन्स) हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेत त्यांच्यासाठी खालील कोर्सेस साठी आपण काय करू शकता.

1.इयत्ता 12 बारावी( विज्ञान) शाखेतील पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बी .फार्मा .(B.Pharm.)नावाचा डिग्री कोर्स तीन वर्षाचा करता येतो .त्यानंतर एम. फार्म.(M.Pharm.) हा पदव्युत्तर कोर्स दोन वर्षाचा पूर्ण करता येतो व त्यानंतर एमबीए(MBA) हे करता येतं ज्यामुळे विद्यार्थ्यांना फार्मासिटिकल कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या चांगल्या पोस्टवर नोकरी मिळते किंवा एमपीएससी च्या माध्यमातून सरकारी नोकरी सुद्धा मिळू शकते.  काही विद्यार्थ्यांना डी. फार्मसी.(D.Pharm.) हा डिप्लोमा कोर्स करून सुद्धा आपल्याला स्वतःचा व्यवसाय मेडिकल शॉप किंवा कंपनीमध्ये नोकरी करता येते.

2. बी.एससी .(B.Sc.)डेअरी टेक्नॉलॉजी हा चार वर्षाचा पदवी कोर्स करून पुढे एम बी ए(MBA) केल्यास चांगला जॉब मिळू शकतो. बी.एससी.  (B.Sc.) एग्रीकल्चरल ही चार वर्षाची पदवी कोर्स तसेच एनिमल हसबंडरी हा पदवी कोर्स आपण पूर्ण करू शकता.

3. बी. टेक.(B.Tech.) हा चार वर्षांचा एग्रीकल्चरल टेक्नॉलॉजी, फुड टेक्नॉलॉजी, ऍग्रो इंजीनियरिंग इत्यादी कोर्स पूर्ण करता येतात .त्यानंतर एम.टेक .(M.Tech)हा त्याच विषयातील स्पेसिफिक पदव्युत्तर कोर्स करून पुढे दोन वर्षाचे एमबीए (MBA)करून मोठ्या कंपन्यांमध्ये काम करू शकता किंवा सरकारी नोकरी मध्ये सुद्धा कृषी विभागांमध्ये नोकरी प्राप्त करू शकता.

4. 12 बारावी (विज्ञान) शाखेतील विद्यार्थ्यांना डी. एड.(D.Ed.) करून शिक्षकी पेशा मध्ये सरकारी किंवा निमसरकारी नोकरी सुद्धा मिळू शकते.त्यासाठी पुढे टीईटी परीक्षा पास करावी लागते

5. बी. टेक .किंवा बी.एस्सी.(B.Tech./ B.Sc.) बायोटेक्नॉलॉजी ही चार वर्षाची पदवी विद्यार्थी घेऊ शकतात त्यानंतर एम .एससी. किंवा एम. टेक.  (M.Sc./M.Tech.)बायोटेक्नॉलॉजी या विषयात घेऊन आपण कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते.

6. 12 बारावी (विज्ञान) शाखेतील विद्यार्थी मॅथेमॅटिक्स हा विषय घेऊन विशेष प्राविण्य प्राप्त झालेले विद्यार्थी बी.ई. किंवा बी.टेक. (B.E./B.Tech. )इंजिनिअरिंगची पदवी(जेई व जेई ऍडव्हान्स देऊन आपण आयआयटी किंवा एनआयटी इन्स्टिट्यूटमध्ये) आपण सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स ,मेकॅनिकल ,कम्प्युटर सायन्स, इंस्ट्रुमेंटल, केमिकल टेक्नॉलॉजी, इत्यादी साईड घेऊन प्राप्त करू शकता व त्यानंतर एम. ई. किंवा एम.टेक.(M.E./M.Tech.) ही पदव्युत्तर पदवी आपण वरील शाखेत मिळू शकता त्यानंतर आपण एम. एस.(M.S.) करण्यासाठी परदेशात सुद्धा जाऊ शकता. गेट(GET) परीक्षा पास झाल्यानंतर आपण प्राध्यापकी क्षेत्रांमध्ये सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी करू शकता. किंवा शासकीय सेवेत सुद्धा आपल्याला सुवर्णसंधी मिळू शकते.

7. 12 बारावी (विज्ञान ) शाखेतील पास झालेल्या विद्यार्थ्यांना जनरल बी .एससी.(B.Sc.) करता येते तीन वर्षाचा पदवी कोर्स असतो. त्यात फिजिक्स ,केमिस्ट्री ,झूलॉजी, बॉटनी ,कम्प्युटर सायन्स, मॅथेमॅटिक्स ,इलेक्ट्रॉनिक्स ,मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फिशरी सायन्स, डेअरी सायन्स, हॉर्टिकल्चर, जिओलॉजी या विषयांचे दोन ते तीन विषयाचे ग्रुप करून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतो व त्यानंतर एम. एससी.(M.Sc.) वरील विषयातील एका विषयांमध्ये दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून पुढे सेट, नेट, गेट, एम .फिल . पी.एचडी. (SET/NET/GET/M.Phil./Ph.D.) पूर्ण करून वरिष्ठ प्राध्यापक म्हणून आपल्याला नोकरी मिळू शकते (विद्यापीठांमध्ये महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी महाविद्यालयात संधी मिळू शकते.)

8.12 बारावी  (विज्ञान) पास होणारे विद्यार्थी पाच वर्षाचा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर(B.Arch.) हा पदवी पदव्युत्तर कोर्स पूर्ण करू शकतात व स्वतःचा व्यवसाय निर्माण करू शकतात .सध्या या व्यवसायाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे.

9. 12 बारावी(विज्ञान) उत्तीर्ण होऊन तीन वर्षाची बी.एसी .(B.Sc.)  पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थी एमपीएससी(MPSC),यु पी एस सी(UPSC) एसएससी (SSC)बी आर बी (BRB)किंवा बीएसएफ(BSF) सी आर पी एफ (CRPF)किंवा सीआयएसएफ(CISF) मध्ये सब इंस्पेक्टर या पदासाठी तयारी करू शकता.

10.आपण बीसीए /बीसीएस हा संगणकाचा पदवी कोर्स व त्यानंतर पदव्युत्तर एम .सी .ए .,एम .सी. एम.(MCA,MCM.) दोन किंवा तीन वर्षाची सॉफ्टवेअर पदवी  शिकू शकता किंवा एमबीए (MBA)पदवी-पदव्युत्तर पऱ्यांचे शिक्षण घेऊ शकता व त्याचा फायदा आपणास आयटी किंवा अन्य कंपनीमध्ये महत्त्वाच्या पदावर नोकरी मिळू शकते. 

 आपण इयत्ता 12 बारावी (विज्ञान) शाखेमध्ये (फिजिक्स ,केमिस्ट्री ,बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स ) विषय घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्याला आपण (जनरल सायन्स) असं म्हणतो.

आज आपण 12 बारावी (विज्ञान )शाखेत (फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी) विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खालील प्रमाणे शिक्षणाच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. ह्या ग्रुप ला आपण (बायलॉजी ग्रुप )असं सुद्धा संबोधतो. जनरल सायन्स मधील बरेच कोर्सेस ला बायोलॉजी ग्रुप च्या  विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेता येतात ज्या विषयाला मॅथेमॅटिक्स ची आवश्यकता आहे असे विषय सोडून.

1. 12 बारावी (विज्ञान) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नीट, एम्स, जीपमर, आर्मी मेडिकल कॉलेज  (NEET/AIIMS/JIPMER/AFMC) सीईटी परीक्षेच्या माध्यमातून आपणास मेरिट बेसवर आपण खालील प्रमाणे कोर्सला प्रवेश घेऊ शकतो.

1.एम .बी .बी .एस .(MBBS)ॲलोपॅथी चार वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी सीईटी च्या माध्यमातून एम .एस. /एम.डी .(MS/MD)हे कोर्स करता येतात किंवा पदवी प्राप्त झाल्यानंतर डिप्लोमा कोर्स ही करता येतात व त्यातून सरकारी नोकरी मध्ये किंवा स्वतःचा  वैद्यकीय व्यवसाय करता येतो सध्या विविध प्रकारच्या तज्ञ डॉक्टरांची खूप मोठी आवश्यकता आहे.

2.बी. ए .एम .एस .(BAMS)आयुर्वेद मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर एम.डी .(MD)विशेष तज्ञ विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी करता येते. भारतीय आयुर्वेद पद्धत खूप जुनी आहे व तिचा खूप मोठा चांगला परिणाम भारतीय औषध व चिकित्सा परंपरेतून भारित भारतीयांना अवगत आहे.

3.बी .एच. एम .एस .(BHMS)होमिओपॅथी मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर एम.डी .(MD)ही होमिओपॅथिक मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण करता येते.

4.बी.डी.एस .(BDS)दंत शास्त्र यानंतर एम.डी.एस.(MDS) ही पदव्युत्तर पदवी दंत शास्त्र या विषयावर प्राप्त करता येते.

5.बी. व्ही .एससी. (B.V.Sc)व्हेटर्नरी सायन्स पदवी घेतल्यानंतर एम .व्ही .एससी (M.V.Sc.)ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करून सरकारी नोकरी किंवा मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक म्हणून काम करता येते. 

6.डी. फार्मा, बी. फार्मा.(D Pharm../B.Pharm.) फार्मासिटिकल डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स पूर्ण करून एम. फार्मा(M.Pharm.). ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करून एमबीए(MBA) केल्यास ोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ नोकर्‍या मिळू शकतात.  

7.बी.एस्सी .(B.Sc.)नर्सिंग होम सायन्स हा पदवी कोर्स करून आपण सरकारी नोकरी किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारचे नोकरी प्राप्त करू शकतो.

8. बी.एससी .(B.Sc.)बायोटेक्नॉलॉजी ,मायक्रोबायोलॉजी, फिशरी सायन्स, जनरल जनरल सायन्स चे विषय मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर एम. एससी.(M.Sc.) आणि त्यानंतर सेट नेट पीएच.डी.(SET/NET/Ph.D.) करून प्राध्यापक क्षेत्रात किंवा संशोधन क्षेत्रात काम करता येते.

9. एन डी ए (NDA) नॅशनल डिफेन्स अकॅडमी ची सीईटी परीक्षा दिल्यानंतर भारतीय संरक्षण दलातला कोर्स पूर्ण केल्यानंतर कॅप्टन या पदावर आपली नेमणूक होऊ शकते.

10. 12 बारावी (विज्ञान ) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पाच वर्षाचा प्लॅनिंग अँड डिझायनिंग हा पदवी कोर्स करू शकतात किंवा तीन वर्षाचा टेक्निकल एंट्री इन इंडियन आर्मी हा कोर्स सुद्धा करता येतो.

11. 12 बारावी (विज्ञान )उत्तीर्ण विद्यार्थी तीन ते चार वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंट पदवी कोर्स सुद्धा करू शकतात व एक ते दोन वर्षाचा फिल्म अँड टेलिव्हिजन डिप्लोमा ,फिल्म एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, फिल्म प्रोसेसिंग , जॉब इन फिल्म प्रोडक्शन ,ॲनिमेशन डिप्लोमा किंवा पदवी कोर्स करू शकतात.

विद्यार्थी मित्रहो वरील बारावी विज्ञान उत्तीर्ण  विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती शैक्षणिक संधी कोणती कोणती आहे ही नमूद केलेली आहे वरील माहिती आवडल्यास कॉमेंट्स आणि शेअर करा.


Tuesday, May 4, 2021

भारतातील विषारी सापाची माहिती (प्रा.सर्जेराव येडेकर एम एस्सी प्राणिशास्त्र सेट पेट)

विषारी साप

 

    नाग Common cobra (Naja Naja Linnaeus-1758)

नाग हा भारताच्या उत्तरपूर्व आणि हिमालयात सोडून भारतात सव ठिकाणी सापडतो.
नागाला  भारतीय कायद्याच संरक्षण आहे (Schedule-II Part-II of WLPA-1972)

 

नाग हा विषारी  साप आहे. नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्या लायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखिल विविध खुणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो. तर काहिंना शून्यचा आकडा (monocol) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहित. नाग हे बरेच लांब साप आहेत. त्यांची सरासरी लांबी १.२ ते २.५ मी असते.
नागाचे मुख्य खाद्य हे उंदीरबेडूकसरडे इतर छोटे प्राणी व पक्षी आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडश्या पाडून शेतकऱ्याची मदत करत असतात. नागाचा मुख्य शत्रु माणूस आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रुंमध्ये मुंगुसगरुडकोल्हेखोकडअस्वले तसेच मोर इत्यादी आहेत. नाग शिकार करतान आपल्या विषाचा प्रामुख्याने उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बगतो व भक्ष्य पूर्ण मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पुर्णपणे गिळतो.नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो (आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे )व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत रक्षण करतो.



     नागाची जास्तीती जास्त लांबी २.२ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. नाग हा धामण आणि खाई इतर बिन विषारी सापन्सारखा दिसत असल्याने त्यांना बघून नाग पहिल्याच गैरसमज होतो.
     नाग (Cobra) याच विष हे अत्यंत घटक असल्यानेतो भारतातील ४ कुप्रसिद्ध सापांपैकी एक आहे. ज्यांना पहिल्या पहिल्या मारून टाकण्याचा प्रयत्न होतो. नागाला कित्येकदा घराभोवती शेतामध्ये पहिले जातेउंदीर आणि इतर कुर्तडनाऱ्या  प्राण्यान्मागे  तो येतोअचानक अडवले असता अगोदर तो फना काढून धमकी देतो परंतुत्यावर पाय ठेवल्यास किव्वा इजा केल्यास तो डसतो.
      नागाच्या विषावर इस्पिताल्न्मध्ये औषधे उपलब्ध आहेत. अनेक वेळा ग्रामीण भागा मध्ये उपचाराऐवजी  घराची घरीच आयुर्वेदिक पद्धती अवलम्बल्या मुळे मृत्यू होतो.

 नागराज King Cobra (Ophiophagus Hannah)

नागराज हा भारतातील पुर्व  दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहेविषारी सापांमध्ये लांबीला सर्वाधिक  विषाच्या प्रभावात नागापेक्षा कमी परंतू मात्रा मोठी असल्याने फार धोकादायकयाचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतोयाचा फणा नागांपेक्षा छोटा असतो डिवचला गेला असता  ते  फूट उंच फणा उभारतोघनदाट जंगले हा साप पसंत करतो  कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतोअभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहेसापांमध्ये अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो ( काही काळापुरतेचअंडी टाकण्यासाठी हा साप घरटे करतोमार्च-एप्रिल दरम्यान मादी वाळलेला पाला-पाचोळा शेपटीच्या साह्याने गोळा करून त्यात १५ ते ३० अंडी घालतेअंड्यातून नुकतीच बाहेर आलेली पिल्ले जवळपास  ते  फूट लांबीची तर पुर्ण वाढलेला नागराज सरासरी १० ते १५ फूट लांबीचा असतोहा साप इतर सापांना खातो याचा रंग गडद हिरवट,राखाडी,पिवळट तपकिरी असून शरीरावर पिवळसर पांढरे आडवे पट्टे असतात.

 

 

किंग कोब्रा किंवा नागराज हा जगातील आकाराने सर्वात मोठा विषारी सर्प आहेयाचे शास्त्रीय नाव ऑफिओफॅगस हॅना (ग्रीक ऑफिऑससाप ; फॅगीखाणेअसे आहे. (नागराज इलेपिडी कुलात असून या कुलातील इतर साप म्हणजे नागअॅाडलर आणि आफ्रिकेमधील ब्लॅक मांबा.) नागराज फक्त साप खाऊन राहतोत्याची लांबी सु. मीटर असतेभारतातील जंगलातून त्याचे प्रामुख्याने वास्तव्य आहेमहाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागामध्ये बंडीपूरकोइमतूरनिलगिरी केरळ राज्यामध्ये आणि आसाममधील अरण्यात नागराजाचे आस्तित्व आहेदक्षिण आशिया मधील फिलिपाइन्स आणि इंडोनेशियामध्ये तो आढळतो.पूर्व चीनमध्ये तो तुरळकपणे आढळतोत्याच्या नावात नाग’ हे विशेषण असले तरी खर्या नागप्रजातिमध्ये त्याची गणना होत नाहीत्याचे प्रजातिनाम वेगळे आहेनागराज हा हल्लेखोर आणि चपळ साप आहेएका चाव्यात मोठ्या प्रमाणात जहाल विष तो भक्ष्याच्या शरीरात सोडतो.

नाग राजाच्या त्वचेचा रंग ऑलिव्ह फळाप्रमाणे हिरवाकाळसर तपकिरी किंवा काळा असतोशरीरावर फिकट पिवळ्या रंगाचे आडवे पट्टे असतातपोट फिकट पिवळे पांढरे खवले मऊ एकसारखे असतातलहान नागराजाच्या काळ्या शरीरावर असलेल्या पिवळ्या पट्ट्यामुळे तो पटेरी मण्यार असावा असे वाटतेत्याला ओळखण्याची खरी खूण त्याचा फणापूर्ण वाढ झालेल्या नागराजाचे डोके मोठे वजनदार भासतेइतर सापाप्रमाणे नागराजाचे दोन्ही जबडे परस्पराना जोडलेले नसल्याने मोठे भक्ष्य सहजपणे त्याना गिळता येतेवरील जबड्याच्या पुढील भागामध्ये दोन अचल पोकळ विषदंत असतातयामधून विष अंतक्षेपण भक्ष्याच्या शरीरात करता येतेनर मादीहून आकाराने मोठा आणि मादीहून जाडीला अधिक असतोनागराजाचे सर्वसाधारण आयुष्य वीस वर्षांचे असते.

ऑफिओफॅगस प्रजातिमधील नागराज हा एकमेव साप आहेइतर नाग नाजा” प्रजातिमधील आहेतइतर नागापासून फण्यावरील खूण आणि फण्याच्या आकारावरून नागराज सहज ओळखता येतोत्याच्या मानेवरील “^” आकाराची खूण इतर नागाच्या फण्यावर नसतेनागराज ओळखण्याची खूण म्हणजे सहज दिसणारे डोक्यावरील दोन पश्चकपाल (ऑक्सिपिटलखवलेडोक्याच्या वरील मागील बाजूस हे खवले असतात.

इतर सापाप्रमाणे नागराजाची जीभ दुभंगलेली असतेसाप नेहमी जीभ बाहेर काढतोजिभेच्या टोकावर आलेल्या गंध कणांचे ज्ञान सापाला टाळूवर असलेल्या जॅकोबसन अवयवामुळे होतेभक्ष्याचे नेमके स्थान आणि मीलनाकाळात मादीचा मीलन गंध ओळखण्यासाठी याचा उपयोग होतोदुभंगलेल्या जिभेच्या सहाय्याने गंधकणांचे त्रिमिति ज्ञान होण्यास मदत होतेनागराजाचे डोळे तीक्ष्ण असतातहालचाल करणारी वस्तू शंभर मीटर वरून त्याला ओळखता येतेमोठ्या आकारामुळे जमिनीमधील कंपनांचे उत्तम ज्ञान त्यास होतेया कंपनावरून आणि गंधज्ञानावरून त्याला भक्ष्याचा अचूक पाठलाग करता येतोएकदा भक्ष्य जबड्यामध्ये पकडले म्हणजे अर्धवट धडपड करणारे भक्ष्य तो जबड्याने गिळण्यास प्रारंभ करतोत्याने विषदंतामधून सोडलेल्या विषामुळे भक्ष्याचे पचन होत असताना नागराज भक्ष्य गिळतोदिवसभरात कोणत्याही वेळी नागराज भक्ष्य पकडतोत्यामुळे सर्पतज्ञांच्या म्हणण्यानुसार नागराज दिनसंचारी आहे.

मानवी संपर्क नागराज सहसा टाळतोपण डिवचल्यावर तो सहज हल्ला करतोशरीराचा पुढील भाग वर उचलून मान सरळ करून विषाचे दात दाखवून फुस्कारा सोडणे हा त्याचा स्वभावनागराजाचा फूत्कार इतर सापांच्या तुलनेने मोठा आहे (२५०० हर्ट्झ) . जवळ आलेल्या कोणत्याही हालचाल करणाऱ्या सजीवमुळे नागराज चिडतोनागराज दोन मीटर परिघामध्ये हल्ला करू शकतोत्यामुळे साप लांब आहे या समजुतीने जवळ गेलेल्या व्यक्तीचा अंदाज चुकतोआणि आपसूखच माणूस नागराजाच्या तडाख्यात सापडतोएका वेळा तो अनेक चावे घेतोप्रौढ नागराज दंश करताना विषाचे दात शरीरात घुसविल्यानंतर दात थोडा वेळ स्थिर ठेवतोएवढ्या वेळेत भरपूर विष भक्ष्याच्या शरीरात गेलेले असतेत्याचा स्वभाव आपणहून हल्ला करण्याचा नाहीडिवचल्यानंतर किंवा अडचणीत सापडल्यानंतर तो स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो.

सापाचा नैसर्गिक शत्रू मुंगूस पण नागराज मुंगूस अंगावर आलेच तर त्याचा यशस्वी प्रतिकार करतेनागराजाच्या मानाने मुंगूस आकाराने अगदी लहान असल्याने हे शक्य होतेया झटापटीत मुंगसाचा बहुधा जीव जातोनागराजाची प्रजाति ऑफिओफॅगस म्हणजे साप खाणारा असे असल्याने नागराजाच्या खाण्यात धामणलहान अजगरसर्व विषारी साप असतातसाप अगदीच दुर्मीळ असतील तर सरडेपक्षी आणि लहान कुरतड्णारे प्राणी तो खातोदक्षिण भारतात चहाच्या मळ्यात नागराजामुळे अनेक मृत्यू झाले आहेतएरवी नागराज मानवी वस्तीजवळ जात नाही.

नागराजाचे विष मज्जासंस्थेवर आणि हृदयावर परिणाम करतेविष मुख्यत्वे प्रथिने आणि बहुपेप्टाइड्ने बनलेले असतेचावा घेताना विषाचे दात शरीरात .२५ ते .५० सेमीघुसतातविषाचा त्वरित मज्जासंस्थेवर परिणाम होतोतीव्रवेदनाचक्कर येणेपक्षाघातशक्तिपात ही लक्षणे ताबडतोब दिसतातहृदयक्रिया बंद होणे कोमा आणि श्वसनसंस्थेचा पक्षाघात यामुळे मानवाचा मृत्यू होतोनागराजाच्या विषाची मृत्यू मात्रा . मिग्रॅम प्रतिकिलो वजन मोजण्यात आली आहेएका अभ्यासात चिनी नागराजाच्या .३४ मि ग्रॅम प्रति किलो मात्रेमुळे मृत्यू ओढवल्याचे आढळले आहेनागराज एका वेळी ३८०-६०० मि ग्रॅम विष अंतक्षेपित करत असल्याने नागराजाने दंश केलेली व्यक्ती पंधरा मिनिटात मरण पावतेसरासरी ३०-४५ मिनिटामध्ये मृत्यू ओढवतोनागराजाने दंश केलेल्या ७५व्यक्ती मरण पावतातसध्या नागराजाच्या विषावर दोन प्रतिविषे उपलब्ध आहेतथायलंड रेड क्रॉस आणि हैद्राबाद मधील सेंट्रल रीसर्च इन्सटिट्यूट या दोन्ही संस्थेने बनविलेली प्रतिविषांची उपलब्धता कमी आहे.

नागराजाची मादी हा एकमेव साप अंड्यांचे रक्षण करतोजंगलातील वाळलेली पाने आणि गवताचा उंचवटा करून त्यामध्ये मादी २०-४० अंडी घालतेअंड्यामधून पिले बाहेर पडेपर्यंत मादी या पानांच्या घरट्यावर वेटोळे घालून बसतेजवळ आलेल्या प्रत्येक प्राण्यास मादी भेसडावतेपानांच्या घरात तापमान २८ अंश सें ठेवलेले असतेअंड्यातून पिले बाहेर येण्याच्या वेळी मादी घरट्यापासून दूर जाऊन एखादे भक्ष्य खातेआपली पिले खाण्याचा नागराजाच्या मादीचा स्वभाव नाहीअंड्यातून बाहेर पडलेली पिले ४५-५५ सेमी लांबीची असतातत्यांचे विष प्रौढाइतकेच प्रभावी असतेपिले जन्मापासून थोडी चिडखोर असतात.

मण्यार  Common Krait and Banded Krait  (bungarus caeruleus)

लांबीपिलांची लांबी १०-११ इंच असतेतर प्रौढ साप  फुटा पेक्षा मोठा अस्तुजास्तीत जास्त लांबी . फुट मोजली आहे.
मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. (इतर विषारी सापनागफुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेतसाधा मण्यार अथवा मण्यारपट्टेरी मण्यार काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतातमण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत  त्यांचा अन्य आग्नेय आशियायी देशांमध्ये वावर आहे.  भारतात आढळणारा साधा मण्यार सर्वत्र आढळतो  राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतोह्याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतातहे खवले शेपटीकडे अधिक  डोक्याकडे कमी कमी होत जातातमण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असतेमण्यार मुख्यत्वे निशाचर आहेअन्नाच्या  थंडाव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात.
अन्न - मण्यारचे मुख्य खाद्य उंदीर  तत्सम कुरतडणारे प्राणीपाली  सरडेइतर छोटे साप  बेडूक इत्यादी आहे
विषमण्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात  त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर (Neural system) होतोमण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते.मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतातचावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहेमण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाहीप्रचंड तहान लागतेपोटदुखी सुरू होते  श्चास घेण्यास त्रास होऊ लागतो[. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.

घोणस Russell’s Viper (Daboia Russelli)

घोणस हा भारतातील एक मंडली सर्प (Viper) जातीचा साप आहेतो उत्तर पूर्व भारत सोडून संपूर्ण देशात आधालातो. पहिल्यांदा पाहून तो अनेकांना अजगर असल्यासारखे वाटते. घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणार्‍या तीन समांतर रेषा आणि त्याचे बेडकासारख्के तोंड. घोणस हिरवापिवळाहलका करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात
घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात.  
घोणसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहेकी घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात.
विष: घोणसाचे विष अतिशय जहाल असते. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणा‍र्‍या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्याकानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.
घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नयेअसे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणेहाच सर्वोत्तम उपाय आहे.रुग्णास धीर द्यावा. अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते. अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो. म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेच आहे.

चापडा  Bamboo Pit Viper (Trimeresurus Gramineus)

चापडा किंवा हिरवा चापडा हा भारतातील सुद्धा एक मंडली सर्प (Viper) जातीचा साप आहे,  हा विषारी जातीतील साप आहे. हा साप हिरव्या रंगाचा असून हे लहान झुडपांच्या फांद्यांवरवेलींवर राहतो. हा साप घोणस प्रमाणेच अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतो. हा साप प्रामुख्याने दक्षिण भारतात सापडतोमहाराष्ट्रातील कोकणबोरिवली राष्ट्रीय उद्यान येथे सापडतो

फुरसे Saw Scaled Viper (Echis)

एक मंडली सर्प (व्हायपर). नाक व डोळा यांच्यामध्ये खळगा नसल्यामुळे याचा सापांच्या व्हायपरिनी उपकुलात समावेश होतो म्हणजे ⇨घोणसाप्रमाणेच हा अरंध्र मंडली’ सर्प आहे. याचे शास्त्रीय नाव एकिस कॅरिनेटस असे आहे. हा विषारी साप भारतात जवळजवळ सगळीकडे आढळतो. बहुधा मैदानी प्रदेशात जरी तो राहत असलातरी १,८२९ मी. किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर तो आढळला आहे. ओसाड व रेताड प्रदेश आणि खडकाळ डोंगराळ भाग या ठिकाणी तो राहतो; दाट जंगलात मात्र तो नसतो. कडक उन्हाचा त्याला त्रास होत नसावा असे वाटते कारण तापलेली वाळू किंवा जमीन यावर तो पुष्कळदा दिसतो. महाराष्ट्रात  कोकणातविशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात हे साप फार आहेत.

फुरसे एक लहानसर (लांबी ४६-५५ सेंमी.) साप आहे; पण कधीकधी ७९ सेंमी. लांबीचे नमुनेही आढळतात. यांचा रंग तपकिरीफिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. पाठीच्या दोन्ही बाजूंवर एकेक फिकट पांढरी नागमोडी रेषा असते. कधीकधी पाठीच्या मध्यरेषेवर लहान पांढऱ्या रंगाच्या काहीशा चौकोनी ठिपक्यांची ओळ असते आणि ते बाजूच्या नागमोडी रेषेला चिकटलेले असतात. डोके तिकोनी असून त्याच्यावर बाणासारखी (­) स्पष्ट पांढरी खूण असते. याचे विषदंत काहीसे लांब असतात. पोटाचा रंग पांढरा असतो आणि त्यावर फिकट तपकिरी किंवा काळे ठिपके असतात. शेपूट लहान असते. 

डोक्यावरचे खवले बारीक असून प्रत्येकावर कणा (कंगोरा) असतो. पाठीवरच्या सगळ्या खवल्यांवर कणा असून त्याला दाते असतात. फुरसे दुष्ट असते. त्याला किंचित जरी डिवचले किंवा चिडविलेतर ते इंग्रजी आठच्या (8) आकड्याप्रमाणे आपल्या शरीराच्या गुंडाळ्या करून त्या एकमेकींवर एकसारख्या घासते. त्यामुळे दाते असलेले खरखरीत खवले एकमेकांवर घासले जाऊन खस् खस् असा आवाज एकसारखा होतो. या स्थितीत वरचेवर जीभ बाहेर काढून ते झटकन डोके पुढे काढते आणि समोर दिसेल त्या पदार्थाचा चावा घेऊन लगेच डोके मागे घेते. हा साप अतिशय चपळ असल्यामुळे तो केव्हा दंश करतो ते पुष्कळदा कळतसुद्धा नाही. त्याला थोडासा जरी धक्का लागला तरी तो चावतो.

हा साप बेडूकसरडेपालीलहान सापविंचू आणि अनेक प्रकारचे किडे खातो. साधारणपणे जुलै महिन्यात या सापाची वीण होतेमादी पिल्लांना जन्म देते.

हा साप लहान असलातरी याचे विष नागाच्या विषाच्या पाचपट आणि घोणसाच्या विषाच्या सोळापट जहाल असते. फुरसे चावलेल्या लोकांपैकी १०-२० % माणसे दगावतात. दंश झाल्यापासून २४ तासांच्या आत मृत्यू येतो किंवा रोगी २-२० दिवसदेखील जगतो. फुरसे लहान असल्यामुळे दंशाच्या वेळी थोडे विष अंगात शिरतेयामुळे बऱ्याच वेळा माणसे याच्या विषाने दगावत नाहीत.

Difference Between Anabolism And Catabolism

Differences between Catabolism and Anabolism    Mr.Sarjerao Yedekar (M.Sc BEd Zoology MH-SET,CTET,P.Hd Apperd) Comparison between  Catabolis...